छान प्रेमकथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
छान प्रेमकथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ९ मार्च, २०१३

एक विलक्षण प्रेमकथा...

Photo: एक विलक्षण प्रेमकथा..
.
अदिती आणि निरव हे गेली दोन वर्षे
रिलेशनशिपमध्ये आहेत.दिवसभर work
मध्ये असणारा निरव दररोज
संध्याकाळी 9 वाजता तिला फोन करायचा. बोलताना त्याचं सुरवातीचं एक वाक्य
कायमचं ठरलेलं असायचं.ते म्हणजे hey
dear i lov u.हे वाक्य ऐकल्याशिवाय
अदितीला कधी झोपच यायची नाही.एक
दिवसही तिचा असा गेलेला नसतो की तिचं
त्याच्याशी फोनवर बोलणं झालं नाही.एक दिवस सत्याचा सामना करायचं ठरवुन
नीरव तिला घरी घेऊन
गेला आणि त्यांच्या रिलेशनशिपविषयी सगळं
सांगितलं.त्याच्या आई
वडीलांनी मोठ्या मनाने
त्यांच्या नात्याला परवानगी दिली.त्यांच्या लग्नाला परवानगी दिली.आणि त्यांना सल्ला दिला की एकदा आपल्या कुलदेवतेला जाऊन या.त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकुन ते
कुलदेवतेच्या दर्शनाला गेले.दोघांनी देवाला नमस्कार
करुन आपली इच्छा देवाजवळ व्यक्त
केली.अदितीने मनोमनी देवाजवळ मागणं
मागितलं
की,देवा निरवच्या कोणत्याही bst 3 wishesh तु पुर्ण कर,एवढंच माझं मागणं
आहे तुझ्याकडे..निरवने मागणं मागितलं
कि,देवा ही जे काही तुझ्याकडे मागतेय ते ते
तु तिला दे.देवाजवळ आपल्या इच्छा व्यक्त
करुन ते तिथुन निघतात.
यानंतर अदितीचं त्यांच्या घरी येणंजाणं म्हणजे कायमचंच होऊन जातं.पण
तरीही त्यांच मोबाईलवरचं बोलणं
काही थांबलं नव्हतं.
एक दिवस
अदिती निरवला पुर्वकल्पना देऊन दोन
दिवसांच्या summer campला जाते,एकडे निरवला त्याच्या working site वर
जोराचा अपघात होतो.त्यामध्ये
त्याला त्याचा जीव
गमवावा लागतो.त्याच्या आईवडीलांना याचा जोराचा धक्का बसतो पण
ते हृदयावर दगड ठेवुन ठरवतात की यातलं
काहीही अदितीला कळु द्यायचं नाही,कारण ती हे अजिबात सहन करु
शकणार नाही.दोन दिवसांच्या समर कँप
नंतर
जेव्हा ती त्याच्या घरी येते,तेव्हा त्याचे
आईवडील त्याच्याविषयी सांगणं
टाळुलागतात.पण हार चढवलेला निरवचा फोटो बघुन,ती हिसक्याने
तो हार खेचते.आणित्यांना म्हणते,अंकल
ही कसली चेष्टा आहे,त्याच्या फोटोवर हार
का चढवला होता तुम्ही ?शेवटी लपवता येणं
कठीण वाटु लागल्यावर ते तिला सर्व
हकीकत सांगुन टाकतात.पण तिला ही गोष्ट न
पटणारी असते.ती म्हणते,हे कसं शक्य आहे?
गेले दोन दिवस आम्ही contact मध्ये
आहोत,त्याने मला कालच तर call
केला होता.ती तिच्या cellphoneमधील
recived calls मधील निरवचा नंबर दाखवते.पण त्यावर आता calling करुन
पाहताना तो नंबर बिझी दाखवत
असतो.पण तरीही ती त्यांना पटवुन
देण्यासाठी सांगते कि निरव every
evening 9.pmला मला कॉल
करतो.आजही तोकॉल नक्कीच करेल. उत्सुकतेपोटी ते थोडावेळ तिच्यावर
विश्वास ठेवतात.
ते सायंकाळचे आठ वाजल्या पासुनच
तिचा cellphone टेबलवर ठेवुन,तीन
बाजुला तिघे जण बसलेले
असतात.तिघांच्याही नजरा cellphone वर खिळलेल्या असतात.तिघांच्याही मनात
एक चलबिचल
आणि भीती असते.घड्याळात 9
चा ठोका पडतो.आणि त्या मोबाईलची रिंग
वाजते.थरथरत्या ह!ताने अदिती तो फोन
लाऊडस्पीकरवर ON करते,आणि त्यातुन आवाज येतो,hey i love u dear! हे ऐकुन
त्याच्या आई वडीलांना हा विश्वास
पटतो की हा निरव आहे
तो म्हणतो,मला माहीतीयेमम्मी पप्पा तुम्हीही मला ऐकताय,अ!
दिती,मम्मी पप्पा जेकाही म्हणतायेत
की मी मेलोयते अगदी खरंय.. अदितीःमग तु सध्या आमच्याशी बोलत
कसा आहेस?कसली मस्करी करतोयस?
निरवःही सुद्धा तुझीच कृपा आहे.तुने
देवाकडे मागितलेले माझे 3 wishash पुर्ण
करण्याचे
मागणे,यातली ही माझी दुसरी wish होती कि मी मृत्युनंतरही काही दिवस
तुझ्याशी बोलु शकेन.आणि तिच
इच्छा सध्या देव माझी पुर्णकरतोय.
ते जाऊदे पण एक लक्षात ठेव तुला आता तुझं
आयुष्य सावरायचंय आणि योग्य तो वर
बघुन तुला लग्न करायचंय माझ्या आठवणीत तु तुझं आयुष्य बरबाद करु
नयेस असं मला वाटतं.
अश्रुंनी भिजलेल्या चेहर्याने
ती म्हणते,ठीकेय मी करीन लग्न! पण
तुझी पहीली wish काय होती.
निरवःअगं ती तर मी मंदिरातच मागितली होती,तु जे मागतीयेस ते
तुला मिळो,आणि देवाने
तुला दिलं....सॉरी पण मला जावं लागेल
उद्यापासुन मी तुला कॉल करु शकणार नाही.
आई वडीलांना तो हिचं लग्न करुन देण्यास
सांगतो आणि लगेच फोन कट होतो.... अदितीच्या मनातला एक प्रश्न तर
अनुत्तरीतच
राहतो की निरवची तिसरी wishकाय
होती.
.
. .
.
.
आज अदितीचं लग्न होऊन सहा वर्षे
झाली.ती एका श्रीमंत घरात
नांदतीये.संध्याकाळचेनऊ वाजतायेत. तिच्या मोबाईलची पुन्हा एकदा रिंग
वाजते,ती फोन उचलते हेलो कोन? समोरुन
आवाज येतो,hey i love u dear!निरव
हा तुच आहेस,कुठे आहेस तु?कुठे होतास तु?
तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर
तिला मिळत नाही.तिच्या cellphone वर पडलेला नंबर ती बघते.तिच्याच
बंगल्यातील hall मधला landlineचा नंबर
असतो तो...
.
bedroomमधुन बाहेर येऊन
ती hallमधल्या त्या phoneकडे ती बघते...फोनवर तिचा साडेतीन
वर्षाचा मुलगा असतो जो तिच्याकडे बघुन
हसत असतो.आत्ता तिला कळतं
की निरवने देवाकडे त्याची तिसरी wish
कोणती मागितली होती ते।
सहा वर्षे निरवच्या आठवणीँनी दबल्या गेलेल्या तिच्या अश्रुंना आज
तिने तीच्या मुलाच्या रुपातील
निरवला मिठीत घेऊन मोकळीक
दिली,ज्यामुळे तिचं मन खुपच हलकं
झालं..
मित्रांनो काहीजणांच प्रेम हे अद्वितीय असतं.जे वास्तविकतेच्या खुपच
पलीकडचं असतं.पण खुप
वेळा अशा प्रेमाला त्याचं योग्य स्थान
मिळत नाही,आणि म्हणुन त्याची योग्य
किंमत कळत नाही.अन
जेव्हा त्याची योग्य किंमत आपल्याला कळते.तेव्हा त्याची किंमत
ठेवण्याइतकी, आपल्याला किँमत
राहीलेली नसत

शनिवार, १ डिसेंबर, २०१२

प्रेमाची किंमत. .

♥ प्रेमातील सुंदर समजूत ♥

प्रेयसी :- "चौकातील मुले आणि बाकी लोक आपल्याकडे संशयाने बघतात, नावे ठेवतात, त्यांना वाटते आपण टाईमपास करत आहोत ..... मला नाही आवडत असं, अशाने खर्या प्रेमाची किंमत कमी होतेना !!!"

हे ऐकून प्रियकर ५०० ची नोट कढतो व तिला विचारतो ह्याची किंमत किती ?


प्रेयसी :- पाचशे !!

प्रियकर ती नोट चुरगाळतो आणि :- "आता ह्याची किंमत किती ?"
प्रेयसी :- पाचशेच !!

प्रियकर :- ती नोट खाली टाकतो, धुळीत मिळवतो " आता ह्याची किंमत किती?"

प्रेयसी :- पाचशेच !!

प्रियकर :- "हं बरोबर !!, आपले प्रेम सुद्धा असेच आहे सोनू, लोकांनी कितीही नावे ठेवली तरी आपल्या प्रेमाची किंमत कधीच कमी होणार नाही !!! ♥ ♥ ♥

प्रेम जिथे जिथे नांदते तिथे तिथे पैसा व प्रसिद्धी देखील नांदते. .



"एक कुटुंब गरीब होत, तरीपण ते नेहमी गरीब लोकांना मदत करायचे, हे बघून देवाला आनंद झाला व त्याने ३ सुंदर पर्या त्यांच्याकडे पाठविल्या,
बायकोने दरवाजा उघडला व त्या ३ अतिशय सुंदर पर्यांना बघून ती आश्चर्य चकित झाली, तेव्हा ....

पहिली परी :- मी प्रेम आणले आहे.
दुसरी परी :- मी पैसा आणला आहे.
तिसरी परी :- मी प्रसिद्धी आणली आहे.
आमच्यापैकी तुम्ही एकीची निवड करू शकता .........

बायकोला कोणाची निवड करावी हे सुचत नव्हते, म्हणून ती नवर्याला म्हणाली, "आपण पैसा घेऊया, आपल्याला फार गरज आहे".

नवरा :- नको !! आपण प्रसिद्धी घेऊया, म्हणजे पैसा आपोआप येईलच.

त्यावरून हे दोघे वाद घालायला लागले, ते पाहून त्यांची मुलगी रडायला लागली व म्हणाली," मला प्रेम हवे आहे, आपल्या घरात भांडणे नको"

तिचे बोलणे ऐकून सर्वांनी प्रेम-परीला आत बोलाविले ................. पण पुढे आश्चार्यची गोष्ट हि झाली कि त्या प्रेम परीबरोबर पैसा व प्रसिद्धी परी देखील आत आल्या.

त्यावर त्या कुटुंबाने विचारले असता, प्रेम-परी म्हणाली ♥ ," जर तुम्ही पैसा-परी निवडली असती तर बाकी परी निघून गेल्या असत्या, पण देवाच्या नियमा प्रमाणे जिथे जिथे प्रेम आहे तिथे तिथे पैसा व प्रसिद्धी नको म्हणतले तरी येतेच, म्हणून ह्या दोघी माझ्या बरोबर येत आहेत" ♥ ♥ ♥

तात्पर्य :- आकाशातून परी येण हि जरी काल्पनिक गोष्ट असली तरी, "प्रेम जिथे जिथे नांदते तिथे तिथे पैसा व प्रसिद्धी देखील नांदते हे मात्र १००% खरे आहे", म्हणून सदैव चांगुलपणा अंगात ठेवून प्रेम करत रहावे"

♥ " Love is what all we need .... Keep Loving Truly ♥

मला खात्री आहे कि तो तूच असशील..!!

एक गरीब प्रियकर त्याच्या श्रीमंत प्रेयसीला म्हणतो - जर मी अजून गरीब
झालो तरी तू मला स्वीकारशील..?

श्रीमंत प्रेयसी - मी तुझ्यासाठीच बनली आहे..!!

गरीब प्रियकर - जर कोणी श्रीमंत मुलगा आला आणि त्याने तुला लग्नासाठी
मागणी घातली तर..??

श्रीमंत प्रेयसी - मला खात्री आहे कि तो तूच असशील..!!..♥

Love is not only an emotion but an eternity too....
keep loving...♥

निकाल :- HIV ............. ( Honey in Veins )

" तुझ्या रक्ताची चाचणी होत आहे ..........
.
.

चाचणी चालू आहे

.
.

निकाल :- HIV ............. ( Honey in Veins )
 शिरे मध्ये मध आहे !!!
♥ ह्याचा अर्थ तू पूर्ण मधा सारखी गोड आहेस .......... ♥ you are shooo sweeeeet ♥ ♥ ♥

माझे सगळे सेन्सर काल पासून बंद पडलेयत...

आज ते दोघेही खुश होते....असणारंच ना?....कारण आज ते खूप दिवसांनी एकमेकांना भेटणार होते.
भेटायचे म्हणून आज ती केस मोकळेच सोडून आली होती....कारण त्याला आवडायचे तिचे मोकळे सोडलेले केस.
त्याला ती जशी आहे तशी आवडायची म्हणून ती सुद्धा तशीच आली होती.....न नटता थटता...एकदम साधी...
त्याने तिला लांबूनच येताना पहिले.
दोघांनाही एकदम आनंदाचे झरे फुटले.....

दोघेही बीचवर गेले बसायला....
दोघांनीही खूप गप्पा मारल्या....
समुद्रावर दोघेही जीव एकदम सुखात बसले होते.

"अथांग सागराची लाट,
दोघांचे हातामध्ये हात,
डोळ्याच्या समईत स्वप्नांची वात,
स्पर्शाची उब अन....सोबत थंड वाऱ्याची साथ"

मधेच तिच्या लक्षात आले कि,तो तिच्याकडेच पाहत बसलाय....तिला लाजायला झाले,
म्हणाली,
"ये जाणा.....माझ्याकडे का पाहतोयस असा.....समोर बघ ना....समुद्र बघ कसा फेसाळलाय....मस्त दिसतोय"
"अगं पण त्याच्यापेक्षा मी आता जो पाहतोय तो समुद्र मस्त दिसतोय."
तिला अजून पाणी पाणी व्हायला झालं....तरीही ती म्हणाली...."बस हा बस झालं..."
तो म्हणाला,"ये ऐक ना....गोव्याचे समुद्र कि नाही मस्त आहेत....शांत एकदम....एकदम......"
"बस बस.....पुरे झाले "गोवा पुराण"......गोव्याचे बीच असे होते...गोव्याचेबीच तसे होते....." तिने त्याचे वाक्य मधेच तोडले.
तो हिरमुसला बिचारा आणि सांगितल्या प्रमाणे समोर समुद्राकडे पाहू लागला.
तिच्या लक्षात आले ते आणि तिने त्याच्या खांद्यावर डोके टेकवले...
म्हणाली,
"तुज्या खांद्यावर डोके ठेवले न कि सगळा त्रास विसरायला होतो......खूप खूप आयुष्य जगावसं वाटतं"
मग काय?......गेला त्याचा सगळा राग.....
ती मधेच शांत झाली,
"माझे बाबा नाही तयार होणार रे आपल्या लग्नाला.....आपणथांबवू हे सगळे...."
"अगं मी समजावेन त्यांना...त्यांना तुला सुखातंच बघायचीय ना.....मी करेन त्यांच्या सगळया इच्छा पूर्ण.जरूर ऐकतील ते"
आणि तो तिला समजावून सांगू लागला....सगळे ऐकून मग ती थोडी शांत झाली....
तिला समजावून मग तो तिच्याकडे थोडीशी पाठ करून बसला,
तिच्या लक्षात आले ते....तिने त्याची हनुवटी धरून त्याचा चेहरा स्वतःकडे फिरवला,
त्याचे डोळे पाणावलेले होते,
म्हणाली,"अरे रडतोस काय वेड्या.....काय झाले?
म्हणाला,"काय नाही गं....खरंच तुजे बाबा त्या नाही झाले तर?....हा विचार करत होतो..तेव्हा जो एकटेपणा वाटेल ना तो जाणवत होतो"
"अरे तू पण ना वेडा आहेस....मंद.....मी कुठे जात नाहीयेय.....मी फक्त तुजीच आहे....फक्त तुझीच"
असे बोलून तिने त्याच्या गालावर चुंबन घेतले आणि म्हणाली,"माझे तुझ्यावर खूप खूप खूप खूप.......खूप प्रेम आहे".
तो म्हणाला,
"काय म्हणालीस?मला ऐकायला नाही आलं....कालपासूनकमी ऐकायला येतंय...
आणि
आता गालावर काय केलंस??????माझे सगळे सेन्सर काल पासून बंद पडलेयत...काही जाणवतच नाहीयेय....पुन्हा कर बघू".
लाजली ती...म्हणाली..."हो का?......बावळट....."

त्यावेळी मी १० वर्षाची होती...


१३ वर्षाच्या एका मुलाला रस्त्याच्या बाजूला एका १० वर्षाच्या सुंदर मुलीचा फोटो सापडतो....
अन तो मुलगा तिच्या प्रेमातपडतो... LOVE AT FIRST SITE वाले प्रेम...
त्याचे प्रेम त्यीच्याबद्दल दिवसेनदिवस वाढतच जाते...
तो त्या मुलीवर खूप प्रेम करायला
लागतो...
पण तो कधीच तिला भेटू शकत नाही...
***************
नंतर त्याचे लग्न होते....
पन बायाको ला तो खर प्रेम देवू शकत नाही....
खूप वर्षानंतर त्याची बायको फोटो पाहून त्याला विचारते...
तुम्हाला हा फोटो कुठे भेटला..??
तो विचारतो,
का..??
ती बोलते - मी हा फोटो लहानपणी हरवला होता,
त्यावेळी मी १० वर्षाची होती...

मन उधाण वार्याचे(एक प्रेमकथा)

मन उधाण वार्याचे(एक प्रेमकथा)

स्वरुप हे अंजलीचे शिक्षक होते.दोघांच्या वयामध्ये जास्त काही अंतर नव्हतंच मुळी.स्वरुपचंअंजलीवर खुप प्रेम होतं.एक दिवस योग्य वेळ बघुन त्याने ते व्यक्त केलं.अंजलीनेही आपल्या आयुष्याचा योग्य साथीदार मिळतोय म्हणुन त्याला होकार दिला.त्यांचं लग्नही झालं.पण लग्नाच्या काही दिवसानंतर अंजलीला कळु लागलं की,स्वरुप आपल्यामध्ये पुरेसं अंतर बाळगतोय जे न

वरा बायकोमध्ये कधीचअसत नाही.तिला हेच समजत नव्हतं कीतो असं का करतोय?प्रेमामध् ये त्यानेच पुढाकार घेतला असतानासुद्धा, मनाविरुद्ध लग्न लावुन दिलेल्या माणसासारखा तिला स्पर्शही करत नव्हता.ही बाब तिने त्याच्या काकांना सांगितली.
त्याचे काका एक मनोवैज्ञानिक तज्ञ असल्याने ते त्याची मानसिक स्थिती योग्य पद्धतीने समजु शकतील असं तिला वाटत होतं.काकांनी एक दिवस हवापालटचा बहाणा करुन माझ्याकडे स्वरुपला घेउन यायला सांगितलं.ठरल्या प्रमाणे ती घेऊन आली.योग्य ती वेळबघुन काकांनी स्वरुपला संमोहीत केलं.आणि त्या अवस्थेत काकांनी त्याला काही प्रश्ने विचारली.विचारले ल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याने दिली.नंतर त्याला नॉर्मल स्थितीतआणलं गेलं.
काका अंजलीला,स्वरुपक डुन मिळालेली सर्व माहीती एकांतात सांगु लागले....
स्वरुपचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं.त्याच्या जन्माच्या दोन वर्षानंतरच त्याचे वडील वारले.त्यामुळे त्याला आपल्या आईजवळच झोपायची सवय लागली.तो कधीही त्याच्या आईला सोडुन दुर झोपलाच नव्हता.आईचं प्रेम म्हणजेजवळजवळ त्याच्यासाठी व्यसनच झालं होतं.पण त्याच्या वयाच्या अठराव्या वर्षी तिच्या आईचा मृत्यु झाला.त्याचा जबर आघात त्याच्या मनावर झाला.अचानक बदललेली ही परिस्थीती त्याचं मन,त्याचा मेंदु स्वीकारु शकत नव्हता.पण त्यावेळी त्याच्या मनाजवळ/ मेंदुजवळ ही परिस्थिती स्वीकारण्याशिवा य दुसरा पर्यायचनव्हता.त्यामुळे त्यावेळची मानसिक स्थिती त्याला दाबावी लागली.दहा वर्षाँनंतर जेव्हा तो शिक्षक होता तेव्हा तु कॉलेजमध्ये नवीन अॅडमिशन घेतलंस.आणि इतकी वर्षे पर्याय नसलेल्या त्याच्या मनाला आई मिळवण्याचा एक पर्याय मिळाला.कारण तुझ्या आणि त्याच्याआईच्या चेहर्यात जवळजवळ 70%साम्य आहे.त्याची वास्तविक स्थिती आणि त्याचं बालपण अशा दोन वेगळ्या स्थितींचं त्याच्या मेंदुत एक प्रकारचं जबर एकत्रीकरण झालंय.जे एकमेकांच्या गरजा पुरवण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळेच त्याच्या बालपणातली आई मिळवण्यासाठी त्याच्या तरुणपणाने तुझ्याशी लग्न केलंय.....
मनोवैज्ञानिक असणार्या काकांचं हे बोलणं ऐकुन तिच्या पायाखालची जमिन सरकली.तिच्या मेँदुतल्या सगळ्या तारा तुटल्यासारखं तिला वाटु लागतं.एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असंही घडु शकतं याचा तिला विश्वासच बसत नव्हता.अंजली काकांना विचारते,मग स्वरुप बरा कसा होऊ शकतो हे सांगाल का?
सांगतो....हे बघ नवरा बायकोच्या बाबतीत स्त्रियांना नॉर्मली असं वाटत असतं की,शरीरसुखाच्या बाबतीत त्यांच्या नवर्याने प्रामुख्याने पुढाकार घ्यावा.पण तुझ्या बाबतीत ही गोष्ट वेगळी आहे.इथे शरीरसुखामध्ये पुढाकार तुला घ्यायचाय.जर तु शरीरसुखामध्ये स्वतःहुन पुढाकारघेतलास आणि त्याच्या मनातल्या तारुण्याच्या भावना जागृत करु शकलीस.तरच तुझा स्वरुप तुला मिळु शकेल.कारण त्याचं तरुणपणच त्याच्या बालपणावर मात करु शकतं..समजलं...ह ो समजलं काका.पुर्ण समजलं,मी तुमची खुप खुप आभारी आहे.मी असंच करेन.
सहा महीन्यानंतर मिठाईचा बॉक्स घेऊन अंजली आणि स्वरुप काकांकडे येतात.अंजली काकांना म्हणते,ही मिठाई कशासाठी माहीतीये का काका?आज मी दोन महीन्यांची गर्भवती आहे.त्यासाठीची आहे ही मिठाई.हे ऐकुन काका दोघांना शुभेच्छा देतात.आणि स्वरुपला ही मिठाई काकुंना देऊन येण्यास सांगतात.स्वरुप आतमध्ये जाताच,अंजली बोलु लागते,काका तुमचे आभार कसे मानावे हेच कळंत नाहीये मला,मी तसंच केलं जसं तुम्ही सांगितलं होतं.त्याने खरंच खुप फायदा झाला आणि आतातर खुपवेळा स्वरुपच अशा गोष्टीँसाठी पुढाकार घेतो.तो प्रचंड रोमँटीक आहे जे मला खुपच आवडतं.
अगं हेच तर हवं होतं मला तुमचं आयुष्य तुम्ही आनंदाने जगताय याशिवाय मला आणखी काय हवं.....
मित्रांनो मी लिहीलेल्या कथा या दररोज संध्याकाळी साडेसात वाजता पोस्ट होतात....
Story presented by एक प्रियकर

एक मिश्किल प्रेमकहाणी भाग 1

एक मिश्किल प्रेमकहाणी भाग 1
अतुल आणि जयश्री हे कॉलेज फ्रेँड्स होते,पण कॉलेज संपल्यावर दोघेही वेगळे झाले,जयश्रीचं लग्न झालं आणि अतुल नोकरीसाठी धावाधाव करु लागला,चार पाच वर्षांच्या बेरोजगारीनंतर शेवटी त्याला मुंबईत नोकरी मिळाली,पण हा मुळचा रत्नागिरीचा असल्याने तिथे ओळखीचं असं नव्हतंच कोणी.पण मुंबईत गेल्यावर कळलं कि इथेच कुठेतरी जयश्रीचं सासर आहे.काही दिवस राहण्याची सोय होईल या अर्थाने त्याने जयश्रीचा पत्
ता शोधुन काढला.घरात प्रवेश करताच त्याला जयश्री दिसली.जयश्रीचा रिकामा गळा आणि मोकळं कपाळ त्याच्या मनात काहुर निर्माण करुन गेलं.अतुलला पाहुन जयश्रीलादेखील आश्चर्य वाटलं.पण थोड्या वेळेच्या शांतते नंतर त्याने जयश्रीला तिच्याबद्दल विचारलं.ती म्हणाली,आमच्या लग्नांनंतरच्या तीन वर्षांत त्यांना एका अपघातात ते गेले..
तिच्या या स्पष्टीकरणानंतर काय बोलावं हेच कळत नव्हतं त्याला..शेवटी धीर देण्यापलीकडे तो काहीच करु शकत नव्हता.त्याने आपल्याला इथे नोकरी मिळाल्याची बातमी त्याला सांगितली,तिला आनंदझाला.पण जागेची अडचण आहे हे कळल्यावर तीच त्याला म्हणाली,तु इथेच राहा ना थोडे दिवस म्हणजे मलाही सोबतच होईल.पण तो म्हणाला,अगं पण तुझे mistar नाहियेत ना आता,त्यामुळे लोक उगाच गैरसमज करुन घेतील त्यामुळेनको.
अरे लोकांना हजार तोँडं असतात,पण सत्य तर एकच असतं ना?त्यामुळे तु इथे बिनधास्त राहा मी लोकांची परवाह नाही करत..
त्यानंतर ते दोघे एकत्रच राहु लागले..दोघांचेह ी workind periods जवळ जवळ same असल्याने,ते एकत्र जेवण घेऊ लागले,एकमेकांसो बत वेळ घालवु लागले.कंटाळवाणं आयुष्य जगणार्या जयश्रीच्या जीवनात रंग चढु लागला,एकमेकांसो बत मस्ती करताना त्यांना कॉलेजचे दिवस परतआल्यासारखे भासु लागले.
अतुलला सकाळी उठायला उशीर व्हायचा.म्हणुन जया त्याच्यासाठी नाष्टा तयार करुन तो टेबलवर ठेवुन जायची.नंतर अतुल तो नाष्टा करुन जॉबवर जायचा.
हळुहळु त्या दोघांना एकमेकांची सवयच झाली.लोक त्यांच्या विषयी कायकाय बोलायचे पण त्यांनी कधी लक्षच दिलं नाही.अतुल हळुहळु जयश्रीच्या प्रेमात पडला होता.शेवटी त्याने एक दिवस जयश्रीला त्याच्या मनातली गोष्ट बोलुन दाखवली.जया लगेच त्याच्यावर भडकली,मी तुला फक्त एक चांगला मित्र मानत होते,पण तु असं बोलुन आपल्या मैत्रीला कलंक लावला आहेस.एका विवाहीत स्त्रिलाअसं विचारणं तुला शोभतं का अतुल?
अगं पण तुझा नवरा या जगात नाहीये,आणि तसंही आपण एकमेकांना चांगली साथ देऊ आयुष्यभर...
पण मला हे मंजुर नाहीये,मी माझ्यानवर्यावर अजुनही खुप प्रेम करते,आणि मी त्याला विसरु शकत नाही..
.
ठीकेय तुझी जी इच्छा असेल ती मला मान्य आहे,असं बोलुन तो झोपी गेला.सकाळी जया उठुन त्याच्यासाठी नाष्टा तयार करुन जॉबवर निघुन गेली.दुपारी launch time मध्ये जेव्हा ती घरी आली तेव्हा तो नाष्टा तसाच टेबलवर होता.आणि एक चिठ्ठी तिथे होती.त्यामध्ये त्याने आत्तापर्यँत दिलेल्या आधाराबद्दल जयश्रीचे आभार मानले होते.आणि तो तिथुन निघुन गेला होता.
तिने अतुल जिथे काम करतो तिथे त्याची चौकशी केली,पण कळलं कि अतुल राजीनामा देऊन काम सोडुन गेला आहे.
दिवसामागे दिवस जात होते,तसतसं अतुलच्या नसण्याची जाणीव तिला होऊ लागली.जेवताना त्याच्या बरोबर केलेली मस्ती,एक मेकांसोबतकेलेले छोटेमोठे वाद तिला आठवु लागले.हळुहळु तिला त्याच्याशिवाय राहणं कठीण होत गेलं,त्याची आठवण सतावु लागली.सर्व गोष्टी समोर असायच्यापण मन सैरभैर असायचं.कशातच लक्ष लागेनासं झालं.तिने तिची ही स्थिती तिच्या मैत्रीणिला सांगितली,मैत्री णीने सांगितलं की,तुझं प्रेम जडलंय त्याच्यावर.जर खरंच या परिस्थितीतुन तुला बाहेर यायचं असेल,तर अतुलशी तु लग्न करुन टाक.आणि तसंही तु या समाजाला जुमानत नाहीस,त्यामुळे त्यांची तु अजिबात परवा न करता एकदा अतुलशी बोलावंस.तिचं म्हणणं जयाला पटलं.दिवसभराची रजा टाकुन ती रत्नागिरीला अतुलच्या घरी गेली.तिथे त्याची म्हातारी आई होती.याआधीही आईला भेटली असल्याने त्यांची ओळख होतीच.अतुलविषयी आईला विचारताच त्या म्हणाल्या,तो सकाळपासुन बाहेरच आहे,कुठे गेलाय ते नाही माहीती.हळुहळु वेळ पुढे सरकत होती,जया तिची वाट पाहत होती.जेवणेही त्यांनी उरकुन घेतली.पण अतुल अजुन आला नव्हता.सायंकाळच े चार,चाराचे पाच वाजले.दुसर्या दिवशी कामावर हजर राहायचं होतं.शेवटी वैतागुन जयाने आईँचा निरोप घेतला,आणि ती मुंबईच्या गाडीत बसली.गाडी चालु झाली,त्याला भेटण्याची आस थांबत नव्हती.गाडीतुन जाताना शेवटी तिला तिचं कॉलेज दिसलं,जुन्या आठवणी त्याज्या झाल्या.गाडी थांबवुन ती थोडावेळ उतरली.कॉलेजचे गेट,क्लास हे बघुन आपण केलेला दंगा,मागे बसुन मैत्रीणीँच्या काढलेल्या खोडी,कॉलेजचे तास चुकवुन कॅँटीनमध्ये घालवलेला वेळ अशा गोष्टी आठवु लागल्या.
.
काय झालं जयाचं?काय अतुलचं प्रेमयशस्वी झालं?जयाला अतुलची साथ लाभली?अतुल गेला कुठे? या प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतील तर थोड्याच वेळेत ईथेच या प्रेमकथेचा उर्वरीत भाग प्रदर्शित होईल तोपर्यँत वाट पहाया कथेच्या पुढच्या भागाची.......


एक मिश्कील प्रेमकहाणी(भाग २)
या कथेचा हा दुसरा पार्ट आहे,हा वाचण्याआधी काल पोस्ट झालेली कथा"एक मिश्कील प्रेमकहाणी"ही वाचा.तरच हा भाग तुम्हाला समजेल....
part 2
त्या निश्चल स्टेजकडे पाहुन अचानक तिला कॉलेजचा तो दिवस आठवला,ज्यावेळी अतुलने "गुलाबी आँखे" हे गाणं गायलं होतं.जे तिला प्रचंड आवडलं होतं.बंद वर्गाँवरून नजर फिरवत असताना तिची नजर एका अशा वर्गावर जाऊन थांबली होती,ज्याचा दरवाजा उघडा होता,तिला वाट

लं कदाचित तिथे कोणीतरी असावं.ती आत गेली,तर खिडकीतुन सुसाट येणार्या वार्याने एका बॅँचवर ठेवलेली एक notebook जिची पाने आपोआप पलटत होती.तिने ती खिडकीची दारे बंद केली,आणि ती notebook आपल्या हाती घेतली.जेव्हा तिने पाहीलं कि यात लिहीलेली कविता कुठेतरी वाचली आहे.तेव्हा तिच्या लक्षात आलं कि ही कविता अतुलनेच लिहीली होती,जेव्हा college चा शेवट दिवस होता त्याच वेळी ही कविता त्याने सर्वाँसमोर वाचली होती.त्यावेळेस तिच्या लक्षात आलं कि अतुल ईथेच कुठेतरी आहे.तिने कॉलेजभर त्याची शोधाशोधसुरु केली.तो कुठे सापडत नव्हता.शेवटी ती टेरेरेस वर त्याचा शोध घेत गेली.अतुल टेरेरेसच्या कडावंर दोन हात टेकवुन,येणार्या हवेची झुळुक डोळे झाकुन अनुभुवत होता,त्याला पाहताच जयाच्या डोळ्यातले अश्रु थांबले नाहीत.आणि आनंदाच्या भराततिने पळत जाऊन अतुलला मागुन मिठी मारली.
अतुलचे डोळे मिटलेलेच होते.तो म्हणाला,आलीस तु, किती वाट पाहीली तुझी.मला माहीती होतं माझं तुझ्यावरचं नितांत प्रेम तुला इथे येण्यास भाग पाडेल आणि माझ्या प्रेमावर असलेला माझा विश्वास मला तुझी वाट पाहण्यास भाग पाडत होता.काय जादु आहे या प्रेमात....आता नाही ना सोडुन जाणार मला?
नाही रे माझ्या राजा,कधीच नाही.तु दुर गेल्यानंतर कळलं,कि तु किती जवळ आहेस माझ्या हृदयाच्या....त् यामुळे मी कधीच तुला नाही सोडुन जाणार.......
.
मित्रांनो ही होती अतुल आणि जयश्रीची प्रेमकहाणी,अतुल ने जयश्रीच्या मनात पेरलेलं प्रेमाचं बीज,आणि त्यानंतर मिळालेल्या दुराव्यानंतरही त्याने त्या बीजाचं एक ना एक दिवसरोप होईल,रोपाचं वृक्ष होईल ही ठेवलेली आशा म्हणजेच त्याने ठेवलेला त्याच्या प्रेमावरच्या या विश्वासानेच त्याला त्याचं प्रेम मिळवुन दिलं......
तर मित्रांनो कथेतुन घ्यायचा बोधतो एवढाच की,आपण म्हणतो की "माझं या मुलीवर प्रेम आहे/मुलावर प्रेम आहे."
या वाक्यातला बाकीच्या गोष्टी ठीक आहेत हो,पण प्रेम,प्रेम या शब्दाचा अर्थ तुम्ही काय गृहीत धरता ते महत्त्वाचं आहे."प्रेम"या शब्दात अक्षरे जरी अडीच असली तरीही,त्या अडीच अक्षरांसोबत खुपशा गोष्टी जोडलेल्या असतात,ज्यांचा आपण रिलेशनशिपमध्ये असताना कधीही विचार नाही करत.त्या गोष्टी म्हणजे,विश्वास, समजुन घेणे,वेळोवेळी प्रेमाची जाणीव करुन देणे,कठीण प्रसंगी साथ न सोडणे,त्याग,निष ्ठा,आपुलकी....
एका typical महाराष्ट्रीयन व्यक्तीच्या हे शब्द डोक्यावरुन जातील पण खर्या प्रेमाची जाणीव असणार्याँना त्यांचा अर्थ आणि महत्त्व नक्कीच समजेल.......





तर मग मला आयुष्यभर अंधारात जगावं लागलं तरी चालेल ...

ती : तू मला कुठे सोडून तर जाणार नाहीस
ना ?

 तो : अग वेडे, आपली सावली कधी आपली साथ
सोडते का, मी तर तुझी सावली आहे.. 

ती : पण मग अंधारात ? अंधारात
जशी सावली आपल्याला विसरते तसं तू पण
मला विसरशील ?

मला अंधाराची खुप
भीती वाटते रे.... 
तो : भिवु नकोस...
मी आहे ना...
अंधार पडला तर
मी लगेच तुला माझ्या मिठीत घेईन ना... 
ती : तसं असेल तर मग मला आयुष्यभर अंधारात
जगावं लागलं तरी चालेल ...

तुझ्या पेक्षा लवकर जात आहे...

एक मुलगा आपल्या girlfriend ला पार्क मध्ये
रोज भेटला जात असे...
.
मुलगा रोज वेळेवर जात होता,
पण ती मुलगी नेहमी उशिरा येत असे..

. पण तो कधीही तिच्यावर नाराज होत
नव्हता.....
.
पण एके दिवशी तो मुलगा पार्कला येत
नाही म्हणून ती मुलगी रागाने घरीजाते.....
. तिथे गेल्यावर समजते कि त्याला ब्लड cancer
आहे.....
.
आणि तो फक्त ५ ते ६ दिवसच जगणार आहे ....
.
ती मुलगी रडत आपल्या घरी येते आणिती आत्महत्या करून त्याच्या साठी एक लेटर
ठेऊन जाते......
.
त्या लेटर मध्ये असे लिहले असते कि,
"तू माझी वाट पाहत होता तेंव्हा मी दररोज
उशिरा येत होते, आणि आता आज मी तुझ्या पेक्षा लवकर जात आहे आणि तिथे
मी तुझी वाट पाहीन"..

शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१२

♥ एक लव स्टोरी ….दुख:द ♥ बघुया तुम्हाला पण रडता येते का ?




एक मुलगा आणि मुलगी यांचे
ए...कमेकावर खूप

प्रेम होते…. ...
पण त्या मुलीचा एका अपघातात
दुख:द मृत्यू होतो..
..
मुलाला ते सहन होत
नाही….तो तिच्या आठवणीत सतत रडत असतो…
तर रडत असताना काही २०-२५
परी तिच्याच वयातल्या त्याला
दिसतात…. त्यात ती पण असते…
त्या सर्व परी कडे एक एक
पेटलेली मेणबत्ती असते पण तिची मेणबत्ती पेटलेली नसते…
.. मुलगा त्याचे तिला कारण
विचारतो…..
तर ती सांगते..
..
.. ..
.. ..
..
आता पुरे कर रे,
किती रडतो आहेस…..
तुझ्या अश्रूमूळे ….मेणबत्ती सारखी वीझत
आहे...♥

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१२

मी वादलाशीही लढले असते..

 एक चिमनि चिमन्या च्या प्रेमात
पडली... तिने त्याला प्रपोस पण केल... पण
मात्र
चिमना चिमनीला म्हणाला मला जास्त
... उंच उडता येत नाही पण तु तर मात्र उंच
उडु शकतेस मग... मग चिमनीने
त्याच्यासाठी स्वतःचे पंख कापुन टाकले...
नंतर त्यांनी दोघांनी छानस-छोटस अस
घरट तयार केल आणि त्यात ते दोघे सुखात

संसार करायला लागले... पण
मात्र एके दिवशी खूप मोठे वादळ आले,
त्या वादळात चिमना हळु-हळु करूनउडुन
गेला पण मात्र चिमनीला पंख नसल्यामुळे
ती उडु शकली नाही... नंतर वादळ शांत
झाल्यावर चिमना आला आणि त्याने
बघितले कि चिमनि मरून
पडलेली होती आणि तिने फांदीवर लिहिले
होते कि"एकदा बोलला असतास
कि मी परत येणार आहे तर
मी वादलाशीही लढले असते..

शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१२

'तुझ्याशिवाय जगण शक्य नाही, तू सोडून गेलीस तर त्याक्षणी मी मरेन...!

हृदयस्पर्शी कथा
ती दोघं...
त्यांच बिनसलच होत गेले काही दिवस तो काहीही बोलला तरी ती त्याचा वेगळा अर्थ
काढायची..
तो बोलला तरी भांडण, गप्प राहिला तरी भांडण ते भांडण मिटवायच म्हणून तो
तिला सिनेमाला घेऊन गेला पण ती गप्पच होती,शांत होती, काहीच बोलायला तयार
नव्हती.
तिचा चेहराच सांगत होता कि,
तिचा निर्णय झालेला होता..
ते घरी परतत होते.
तो गाडी चालवत होता.
शेवटी न राहवून ती त्याला म्हणालीच.. "मला वाटत..,
हे अस रेटण्यात आणि एकमेकांना छळण्यात काहीच अर्थ नाही..
मला वाटत आपण आपापल्यां वेगळ्या वाटांनी जाव..
मी तरी तसा निर्णय घेतलाय..
यापुढे आपण न भेटनच योग्य...!
ते ऐकून त्याला धक्काच बसला..
त्याने गाडी स्लो करत रस्त्याच्या एका बाजूला नेऊन थांबवली त्याचे डोळे
पाण्याने डबडबले ,
त्यान खिशात चाचपून पाहिलं.
एक कागदाच चीटोर तिच्या हातात देत डोळे पुसले..
आणि ती चिट्ठी उघडून वाचणार तेवढ्यात समोरून एक भरधाव गाडी आली..
थेट यांच्या गाडीवरच येऊन
आदळली..
त्या अपघातात 'तो' जागीच ठार झाला..
आणि तिला मात्र किरकोळ जखम झाली... हातात ते चीटोर तसंच होत..
ते एकदम उघडून तीन पाहिलं तर त्यावर फक्त एकच वाक्य
लिहिलेलं होत ..
'तुझ्याशिवाय जगण शक्य नाही, तू सोडून गेलीस तर त्याक्षणी मी मरेन...!

तो खरच त्याक्षणी मेला होता..
प्रेम असंही असत...
जे मागू ते देऊन मोकळ होत..
मागायचं काय, मरण कि जगण...
हे प्रेम करणाऱ्यांनाच ठरवावं लागत....!

मध्यम वर्गीय प्रियकराची गोड प्रेम कहाणी...

♥ छोटीशी पण मध्यम वर्गीय प्रियकराची गोड
प्रेम कहाणी, ♥
प्रियकर :- हा बघ मी नवीन मोबाईल घेतला .....
प्रेयसी :- सहीच,
मोठ्ठी पार्टी पाहिजे ..... :-))
( संध्याकाळी प्रियकर तिला ताज हॉटेल मध्ये
घेऊन जातो व बोलल्याप्रमाणे
मोठ्ठी पार्टी देतो , तेव्हा पार्टी नंतर ........ )
प्रेयसी :- तू एवढे पैसे कसे म्यानेज केलेस
प्रियकर :- माझा मोबाईल विकला .. ♥ ♥

रविवार, ८ एप्रिल, २०१२

विश्वास..

♥ ऐक सुंदर प्रेम कथा जरूर वाचा ........ ♥ ♥ ♥

ऐके दिवशी देव पृथ्वीवरच्या प्रेम करणाऱ्या दोन जीवांसाठी ऐक खुर्ची पाठवतो .
ती खुर्ची खूप खास असते .
कारण त्या खुर्चीवर बसून माणूस जर खर बोलला तर त्या खुर्चीवरचा हिरवा दिवा पेटणार असतो
आणि जर
त्या खुर्चीवर बसून माणूस जर खोट बोलला तर त्या खुर्चीवरचा लाल दिवा पेटणार असतो

मुलगा त्या खुर्ची वर बसतो
मुलगी : तू माझ्यावर प्रेम करतोस का ?
मुलगा : हो मी तुझ्यावर प्रेम करतो ( लगेच लाल दिवा पेटतो )
मुलगा घाबरतो
मुलगी : घाबरू नकोस . देवाची काहीतरी चूक झाली असेल हि खुर्ची बनवताना
आपण परत एकदा प्रयत्न करून बघू

मुलगा परत एकदा त्या खुर्ची वर जावून बसतो .
मुलगी : तू माझ्या वर प्रेम करतोस का ?
मुलगा : हो मी तुझ्यावर प्रेम करतो ( लगेच हिरवा दिवा पेटतो )
काही कळल का तुम्हाला ?

जेव्हा तो मुलगा पहिल्यांदा त्या खुर्चीवर बसला
तोपर्यंत तरी त्या मुलाच त्या मुलीवर खर प्रेम नव्हत .
पण जेव्हा त्याने त्या मुलीचा आपल्यावर असेलला विश्वास पाहिला आणि तो तिच्यावर खर खुर प्रेम करू लागला
यालाच म्हणतात प्रेम .................

♥ म्हणून लक्ष्यात ठेवा मित्रानो ऐक तर्फी प्रेम सुद्धा यशस्वी होऊ शकत
फक्त तुमचा तिच्यावर / त्याच्यावर असेलला विश्वास कुठेही कमी झाला नाही पाहिजे ♥

शुक्रवार, २३ मार्च, २०१२

शब्दा वाचून तिला, सगळ काही कळते...

ती: खूप दिवसा पासून काही तरी विचारायचं होता... विचारू का?

तो: permission काय घेतेस... विचार जे विचारायच्या ते...
ती: तू रोज कविता का करतोस?
तो: मनातल सगळ सांगण्यासाठी...
ती: मग कवितेत का रडतोस?
तो: माझ एकटे पण विसरण्यासाठी...
ती: कशी सुचते रे कविता तुला ? कसे सुचतात रे शब्द ?
भिडते रे मनाला कविता तूझी, अन वाचून होते, मी रे स्तब्ध...
तो: कशी सुचते ते मला माहित नाही, पण लिहितो मी काही तरी...
शब्द नसतात ग त्यात, रचत मी भावनांची रांगोळी ...
ती: कोणासाठी लिहितोस रे ह्या सगळ्या कविता ?
तो: आहे कोणीतरी ... जी माझी असून हि माझी नाही...
ती: ह्म्मम्म्म.... दिसते रे कशी? राहते रे कुठे?
तो: दिसते ती परी सारखी, अन राहते......
हम्म्म्म..... राहते माझ्या हृदयात...
ती: (रागावून) नाही सांगायचं तर तस सांग... पण फुकट पकावू नकोस ..
तो: चालेल सांगतो, पण तू आता रागाऊ नकोस...
ती आहे परी सारखी , फक्त माझ्यशीच बोलणारी...
मनातल सगळ काही फक्त मलाच येऊन सांगणारी...
दररोज मला भेटणारी, अन माझ्या समोर बसून,
फक्त मलाच पाहणारी ....
ती: (विचारात गुंग होऊन) कोण असेल ती????

तो: (तिच्याकडे पाहत हसतो, अन मनातल्या मनात बोलतो )
तू समोर असून हि, तुला सांगता येत नाही...
मनातल गुपित माझ्या,का जणू मांडता येत नाही...
घाबरतो ग, हरवून बसेन मी तुला ,
कारण तुझ्या शिवाय, आता मला जगणं जमत नाही....

काही वेळाने तिला कळतं, त्याच्या मनातल गुपित,
आपोआप उलगडतं, तो काहीही न बोलता,
ती सगळ बोलते, मैत्रीच्या नात्याला,
प्रेमाच नाव जोडते...
कळत नकळतच ते मित्र होतात, कळत नकळतच प्रेम जुळते,
तो काहीच बोलत नाही, तरीही,
शब्दा वाचून तिला, सगळ काही कळते...
शब्दा वाचून तिला, सगळ काही कळते...

मी तुझ्याशी भांडतो...

 ती: तू माझ्याशी भांडत नको जाऊ बरं ....

तो: ते आपल्याला जमणार नाही... तेवढं सोडून बोल.. मी तर भांडणार...

ती: किती नालायक आहेस... काय मिळतं तुला माझ्याशी भांडून...

तो: हो, नालायक तर आहेच... अगं ते गाणं नाही ऐकलयेस का... "कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है"...

ती: हो ऐकलय...

... तो: पण तसं काहीही नाहीये ....

ती: (वैतागून, त्याच्या खांद्यावर ४-५ चापटा मारत)... जा बाबा.. जा ...

तो: अरे हो हो... बरं ठीक आहे.. आता ऐक...
मी तुझ्याशी भांडतो... भांडतांना माझ्यावर जो हक्क दाखवतेस ना.. त्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो... तुझे, "मी आहे म्हणून सहन करतीये" हे शब्द पेलण्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो... "आजपासून बिलकुल बोलू नकोस माझ्याशी" हे वाक्य म्हणतांना तुझा बिथरलेला आवाज ऐकण्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो... चेहऱ्यावर राग असतांना देखील एका अनामिक ओढीने माझ्याकडे बघणाऱ्या त्या डोळ्यांसाठी...

अन

मी तुझ्याशी भांडतो...
भांडण संपल्यावर, तू मारलेल्या घट्ट मिठीत घालवता येणाऱ्या
....... त्या अविस्मरणीय "..क्षणांसाठी.."

तेव्हा पासून प्रेम हे आंधळ आहे..

एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी लपा-
छपी खेळायचे ठरवले, वेड्यावर राज्य होत,
तो १,२,३ ....असे आकडे म्हणू लागला,
इकडे प्रेम लपण्यासाठी जागा बघत होत, पण
प्रेमाला प्रेमाची जागाच मिळत नव्हती, वेड्याचे
आकडे जेव्हा संपत आले तेव्हा प्रेमाने पटकन
समोरच्या झुडपात उडी टाकली, ते झुडूप
गुलाबांच्या फुलांच होत आणि तेथे प्रेम लपून
बसलं .............
वेड्याने प्रेमाला भरपूर शोधलं, पण प्रेम
काही मिळाले नाही, शेवटी स्वताहाची हार
सहन न झाल्या मुळे वेड्याने चिडून
समोरच्या झुड्प्यात जोराने काठी खुपसली व
बाहेर काढली ........
बाहेर काढल्या नंतर काठीला लागलेलं रक्त बघून
वेड दचकला त्याने झुडूपा मध्ये वाकून बघितलं,
तेव्हा तिथे त्याला हसत असलेल प्रेम दिसलं, पण
तो पर्यंत ते प्रेम आंधळ झाल होत कारण
ती काठी त्या प्रेमाच्या डोळ्यात
खुपसली गेली होती ..........
ते पाहून वेड खूप रडला आणि त्याने प्रेमाला वचन
दिले कि इथून पुढे तू माझ्या डोळ्यांनी बघशील
म्हणजेच
मी नेहमी तुझ्या आधारासाठी तुझ्या बरोबर
राहीन ...............
♥ तेव्हा पासून प्रेम हे आंधळ आहे आणि प्रत्येक जण
प्रेमात वेडा आहे. ♥
 

रविवार, २२ जानेवारी, २०१२

एक नितांत सुंदर प्रेम कहाणीउल्हास हरी जोशी


उल्हास हरी जोशी
रोज सकाळी बरोबर आठ वाजता मि. जॉन माझ्या स्टोअरमधे येतात. ते न चुकता रोज गुलाबाची ताजी फुले वीकत घेतात. तसेच माझ्या स्टोअरमधे मीळणारे काही मोजकेच पण ताजे खाद्य पदार्थ वीकत घेतात. बरोबर साडे आठ वाजता स्टोअरमधुन बाहेर पडतात. गेली पांच वर्षे त्यांचा हा उपक्रम चालु आहे. उन असो, पाऊस असो, वारा असो, थंडी असो, बर्फ असो, त्यांच्या या प्रोग्रॅम मधे खंड पडलेला नाही. मधे त्यांची तब्येत बरी नव्हती तरी सुध्धा ते नीयमीतपणे येत होते. ते रोज गुलाबाची फुले घेतात म्हणजे नक्कीच आपल्या बायकोसाठी घेत असणार! त्यांचे त्यांच्या बायकोवर फारच प्रेम दीसते!
एक दीवशी जरा मोकळा वेळ होता तेव्हा मी जॉन साहेबांशी संवाद साधायचा प्रयत्न केला. तसे ते फार मीतभाषी. कधी कोणाशी फारसे बोलत नाहीत. पण त्यांचा मुड पण जरा वेगळा दीसत होता.
“ फुले कोणासाठी? बायकोसाठी वाटत!” मी प्रश्न केला
... “ बायको?” जॉनसाहेब क्षणभर गोंधळले व म्हणाले, “ नाही! मी अनमॅरीड आहे!”
“मघ ही फुले?” मी विचारले
“ ती माझ्या मैत्रिणीसाठी!” जॉनसाहेब उत्तरले.
“मैत्रीण?” मी जरा खोचकसारखे विचारले.
“ शाळेमधे असताना आमचे प्रेम प्रकरण होते. पण त्याला बरीच वर्षे झाली. मग तिचे लग्न झाले आणि मी अनमॅरीड राहिलो.” सहज सांगावे तसे जॉनसाहबांनी सांगीतले.
“तुमची मैत्रीण इथेच असते कां?” मी विचारले
“हो इथेच असते, हॉस्पीटलमधे!” जॉनसाहेब म्हणाले.
“हॉस्पीटलमधे?” मी म्हणालो.
“होय! गेली दहा वर्षे ती हॉस्पीटलमधे आहे. कार ऍक्सीडेन्टमधे तिचा नवरा गेला. तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. त्यामुळे ती स्मृती हरवुन बसली आहे. कोणाला ओळखत सुध्धा नाही. मी रोज सकाळी बरोबर नऊ वाजता तिच्याबरोबर ब्रेकफास्ट घेतो.” जॉनसाहेब म्हणाले
“ पण ती तुम्हाला तरी ओळखते कां?” मी जॉनसाहेबांना विचारले
“बहुतकरुन नसावी!” जॉनसाहेब म्हणाले. “तिला एव्हडेच ठाऊक आहे की रोज सकाळी नऊ वाजता कोणीतरी एक माणुस तिच्याबरोबर ब्रेकफास्ट घ्यायला येतो. याची तिला येव्हडी सवय झाली आहे की जर एखाद्या दीवशी मी गेलो नाही तर ती दीवसभर उपाशी बसते.”
जॉनसाहेबांच्या सामानाची पीशवी त्यांच्या हातात देताना मी त्यांना विचारले, “ पण तिचे तुमच्यावर प्रेम आहे कां?”
“ठाऊक नाही!” सामानाची पीशवी उचलताना जॉन साहेब म्हणाले, “पण माझे तिच्यावर प्रेम आहे ना!”
वयाच्या सत्तरीत सुध्धा आपल्या प्रेयसीवर निरपेक्षपणे प्रेम करणार्याल जॉनसाहेबांना बघुन माझे डोळे भरुन आले. माझे आश्रृ आनंदाचे होते, कृतज्ञतेचे होते की आणखी कशाचे होते माझी मलाच कळले नाही..