प्रेम पत्र
कवीवर्य- श्री हणमंत शिंदे .
संदेश पाठवणारा -आदर्श नगारे. संपर्क :9637989762
सगळीच पत्र तिच्या पर्यंत पोहचतात असं नाही
आणि पोहोचलीच तरी पत्र सगळच बोलतात अस हि नाही
काही पत्र जिंकतात,जन्माला येवून सार्थ ठरतात
काही पत्र हरतात म्हणून का ती व्यर्थ जातात !!
तिचा नकार सुद्धा मनात घर करून राहतोच कि आणि
तिने फाडलेल पत्र आपण पुन्हा पुन्हा पाहतोच कि...
ती अशी बसायची ,खळीखळीन हसायची
साडी नेसून संमेलनात किती छान दिसायची
कोणते बरे गाणे तिने संमेलनात गायलेलं
आणि गाता गाता आख्या वर्गात फक्त माझ्या कडेच पाहिलेलं
वाटते ना सगळ कसं काल घडल्या सारखं
वाटते ना पायावरती पत्र पडल्या सारखं
म्हणून पत्र लिहायचं पटेल किंव्हा फाटेल
आठवणींच्या वृंदावनात निदान राधा तरी भेटेल....