शुक्रवार, २३ मार्च, २०१२

शब्दा वाचून तिला, सगळ काही कळते...

ती: खूप दिवसा पासून काही तरी विचारायचं होता... विचारू का?

तो: permission काय घेतेस... विचार जे विचारायच्या ते...
ती: तू रोज कविता का करतोस?
तो: मनातल सगळ सांगण्यासाठी...
ती: मग कवितेत का रडतोस?
तो: माझ एकटे पण विसरण्यासाठी...
ती: कशी सुचते रे कविता तुला ? कसे सुचतात रे शब्द ?
भिडते रे मनाला कविता तूझी, अन वाचून होते, मी रे स्तब्ध...
तो: कशी सुचते ते मला माहित नाही, पण लिहितो मी काही तरी...
शब्द नसतात ग त्यात, रचत मी भावनांची रांगोळी ...
ती: कोणासाठी लिहितोस रे ह्या सगळ्या कविता ?
तो: आहे कोणीतरी ... जी माझी असून हि माझी नाही...
ती: ह्म्मम्म्म.... दिसते रे कशी? राहते रे कुठे?
तो: दिसते ती परी सारखी, अन राहते......
हम्म्म्म..... राहते माझ्या हृदयात...
ती: (रागावून) नाही सांगायचं तर तस सांग... पण फुकट पकावू नकोस ..
तो: चालेल सांगतो, पण तू आता रागाऊ नकोस...
ती आहे परी सारखी , फक्त माझ्यशीच बोलणारी...
मनातल सगळ काही फक्त मलाच येऊन सांगणारी...
दररोज मला भेटणारी, अन माझ्या समोर बसून,
फक्त मलाच पाहणारी ....
ती: (विचारात गुंग होऊन) कोण असेल ती????

तो: (तिच्याकडे पाहत हसतो, अन मनातल्या मनात बोलतो )
तू समोर असून हि, तुला सांगता येत नाही...
मनातल गुपित माझ्या,का जणू मांडता येत नाही...
घाबरतो ग, हरवून बसेन मी तुला ,
कारण तुझ्या शिवाय, आता मला जगणं जमत नाही....

काही वेळाने तिला कळतं, त्याच्या मनातल गुपित,
आपोआप उलगडतं, तो काहीही न बोलता,
ती सगळ बोलते, मैत्रीच्या नात्याला,
प्रेमाच नाव जोडते...
कळत नकळतच ते मित्र होतात, कळत नकळतच प्रेम जुळते,
तो काहीच बोलत नाही, तरीही,
शब्दा वाचून तिला, सगळ काही कळते...
शब्दा वाचून तिला, सगळ काही कळते...

मी तुझ्याशी भांडतो...

 ती: तू माझ्याशी भांडत नको जाऊ बरं ....

तो: ते आपल्याला जमणार नाही... तेवढं सोडून बोल.. मी तर भांडणार...

ती: किती नालायक आहेस... काय मिळतं तुला माझ्याशी भांडून...

तो: हो, नालायक तर आहेच... अगं ते गाणं नाही ऐकलयेस का... "कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है"...

ती: हो ऐकलय...

... तो: पण तसं काहीही नाहीये ....

ती: (वैतागून, त्याच्या खांद्यावर ४-५ चापटा मारत)... जा बाबा.. जा ...

तो: अरे हो हो... बरं ठीक आहे.. आता ऐक...
मी तुझ्याशी भांडतो... भांडतांना माझ्यावर जो हक्क दाखवतेस ना.. त्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो... तुझे, "मी आहे म्हणून सहन करतीये" हे शब्द पेलण्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो... "आजपासून बिलकुल बोलू नकोस माझ्याशी" हे वाक्य म्हणतांना तुझा बिथरलेला आवाज ऐकण्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो... चेहऱ्यावर राग असतांना देखील एका अनामिक ओढीने माझ्याकडे बघणाऱ्या त्या डोळ्यांसाठी...

अन

मी तुझ्याशी भांडतो...
भांडण संपल्यावर, तू मारलेल्या घट्ट मिठीत घालवता येणाऱ्या
....... त्या अविस्मरणीय "..क्षणांसाठी.."

चारोळ्या

मी तुझी नेहमी आठवण काढेन
तू काढलीस नाही तरी चालेल,
होऊन होऊन काय होणार आहे
थोडसं वाईट वाटेल माझ्या मनाला एवढंच ना..?
-
... ... तुला स्वप्नातही वाटणार नाही
इतके प्रेम देऊन जाईन मी,
आयुष्भर तुझी साथ देणारे
अगणित प्रेम-पुरावे कशी जाळशील तू आता..?
-
मी समोरून येताना दिसल्यावर
कदाचित तू रस्ताही बदलशील,
पण जरा विचारून बघ स्वतःला
मिटवू शकशील का तू हृदयातील माझी प्रतिमा..?
-
स्वप्नांच्या दुनियेत हरवशीलही तू
अवकाश्यात उंच झेप घेशीलही तू,
मात्र माझ्या इतके प्रेम करणारे हृदय
सांग सखे, पुन्हा हेच हृदय शोधू शकशील का तू..?

प्रेमात पडल्यानंतर लक्षात ठेवण्याच्या १२ गोष्टी...

लव्ह अँट फस्ट साईट असो, नाहीतर तिच्या प्रचंड नखर्‍यांनंतर आणि नकारांनंतर मिळालेला होकार असो.किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये अलगदपणे फुललेलं प्रेम असो.. आपण कशाप्रकारे प्रेमात पडतो हे महत्त्वाचं नाही; कारण प्रेमात पडणं तसं सोपं आहे; पण ते प्रेम निभावणं मात्र महाकठीण. एकमेकांना ‘पटवण्याच्या’ हजारो पद्धती तुम्हाला माहीत असतील; पण प्रेमात पडल्यानंतर ते प्रेम निभावणं. फुलवणं त्याचं काय.? ते जमतं तुम्हाला.? की ज्या नात्यावर मनापासून प्रेम केलं तेच नातं जगण्यावर उदास सावली धरतं. तसं कुणाचंचं होऊ नये. म्हणून प्रेमात पडल्यानंतर लक्षात ठेवण्याच्या १२ गोष्टी. प्रेमानं जगण्याच्या, जगवण्याच्या.!

१) कुठलंही नातं विश्‍वासावर अवलंबून असतं. प्रेमात पडल्यानंतर त्या दोघांमध्ये विश्‍वासाचं एक नातं तयार होतं. पण निर्माण झालेला विश्‍वास टिकवणं मात्र गरजेचं असतं. तेव्हा एकमेकांपासून कुठलीही गोष्ट लपवू नका. नात्यात जितकी पारदर्शकता असेल तितकं तुमचं नातं तुम्हाला आनंद देईल.
२) एकमेकांना कधीही गृहीत धरू नका. प्रेमात पडल्यानंतर होतं काय की समोरच्या माणसाबद्दल आपण पझेसिव्ह होत जातो. पण सतत एखाद्या माणसाला गृहीत धरलं गेलं तर त्यातून नाराजी निर्माण होऊ शकते.
३) प्रेमात पडलो आहोत म्हणजे सतत गोड-गोडचं बोलू, असं काही होत नाही. समोरच्यानं आपल्यापेक्षा निराळं मत मांडलं तरी ते ऐकण्याची, समजून घेण्याची आणि आपल्या मतापेक्षा ते अधिक योग्य असल्याचं लक्षात आलं तर अमलात आणण्याची तयारी असली पाहिजे. अनेकदा होतं काय की मत ऐकून घेतलं जातं; पण निराळं असेल तर त्यावर भांडणं होतात.
४) सतत ‘आय लव्ह यू’ म्हटलं नाही तरी आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीची काळजी आहे हे आपल्या कृतीतून व्यक्त झालंच पाहिजे. एखादं छोटंसं गिफ्ट किंवा एसेमेस किंवा भेट झाल्यानंतर मोकळं हास्य यातूनही ही गोष्ट व्यक्त होऊ शकते. प्रेम आहे पण दाखवायचं नाही, अशी काही जणांना सवय असते.
५) अनेकदा पझेसिव्हनेस इतका वाढतो की आपल्या प्रिय व्यक्तीच्या इमेल आणि सोशल नेटवर्किंग साईटचे पासवर्ड मागितले जातात. तुमचं खरंच एकमेकांवर प्रेम असेल तर पासवर्ड मागू नका. आपण प्रेमात पडलो म्हणजे आपली आयुष्य एक झाली असं होत नाही.
६) अनेक प्रेमप्रकरणे मोडतात ती इगोमुळे. त्यामुळे रागवा, भांडा अगदी अबोले धरा पण शेवटी सारं विसरून एक व्हा. तरंच नातं निभावणं सोपं जाईल.
७) प्रेम आहे म्हटल्यावर एकमेकांची ओढ वाटणार. पण प्रेम आहे म्हणजे शरीरसंबंध झालाच पाहिजे असं काही नाही. त्यामुळे जवळीक असली तरी त्यापुढे जाऊन शरीरानं एकत्र येण्याचं शक्यतो टाळा.
८) प्रेमात पडला आहात म्हणजे आता मिठी मारलीच पाहिजे, चुंबन घेतलंच पाहिजे असं काही नाही. तुमच्या जोडीदाराची याबद्दलची मतं समजून न घेता स्वतच्या भावना त्याच्यावर लादण्याची चूक करू नका.
९) तुम्ही एकत्र फिरलात की चार लोकांना त्याबद्दल समजणार. चर्चा होणार. गॉसिपही होणार. पण आपल्या प्रेमावर विश्‍वास ठेवून आहे त्या निर्णयावर ठाम राहा. मात्र, आपलं प्रेम बदनाम होईल असं चारचौघात वावरणं म्हणजे स्वातंत्र्य आहे.
१0) भटका, सिनेमे टाका, पावसात चिंब भिजा, लाँग ड्राईव्ह वर जा..मज्जा करा. पण जरा डोकं ठिकाणावर ठेवून, नाहीतर आपली शोभा व्हायची समाजात.
११) एकमेकांची आर्थिक स्थिती समजून घेणं जरुरीचं आहे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघंही एकाच आर्थिक गटातले असाल असं नाही. एकमेकांना आर्थिक गटावरून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे डिवचू नका. महागडी गिफ्टस्, शॉपिंग, डिस्को आणि तत्सम गोष्टींसाठी जोडीदाराने पैसा पुरवावा अशी अपेक्षा का करायची.? विशेषत मुली. गिफ्ट म्हणजे प्रेम नव्हे.
१२) जे करायचं ते मदमुराद. मोकळेपणानं. दिलखुलासपणे करा, पण कमिटमेण्ट पाळा. प्रेम म्हणजे जबाबदारी, तो स्वीकारता यायला हवी.

- Ajay Panchal -

तीचं माझं नातं...

तीचं माझं नातं अस असावं
कोवल्या उन्हात जसं सोनेरी फुल फुलावं
वाटत तीन जवळ बसावं
स्वत:शीच गालात हळुच हसावं
जमलंच तर् एखाद गाण म्हणावं
किंवा नुस्तच मुक्याने बोलत रहावं

तिच माझ नात अस असावं….
वाटत तीला जवळ घ्यावं
नुस्तच तीच्याकडे बघत रहावं
मिठीत तीच्या हरवुन जावं
हळुच तीच्या ओठातल अम्रूत प्यावं

तिचं माझ नातं असं असावं…
माझं सुख तीला सांगावं
दुख्ख तीचं जाणून घ्यावं
हळुच तीच्या कुशीत शिरावं
मोठं होउन सांत्वन करावं

तिचं माझं नातं असं असावं…

मिठीत घे ना रे ..

ती पहिली मिठी, अन तो गोड शहारा... ,
तुझे ते प्रेम अन तो जिव्हाळा... , ♥

त्या गाजवलेल्या मद रात्री... ,
त्या फुलणाऱ्या गुलाबी पहाट..., ♥

या दोहोंमध्ये रंगलेले आपले ...,
ते गोड निरंतर असे संवाद...,♥

आज न जाणो तू कुठे आहेस ...,
तुझे प्रेम अजूनही मनात दडलेले आहे.., ♥

या गुलाबी अशा थंडीने..,
पुन्हा एकदा आठवण करून दिलीय...♥

खूप थंडी आहे ..,
मला अलवार मिठीत घे ना रे ...♥

लग्न लग्न म्हणजे काय असतं?


लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्याचेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं.


लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं
तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं.


लग्न लग्न म्हणजे काय असतं?
तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं
त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं.


लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणिवांचंकोंदण असतं
तिच्या खर्चाला त्याच्या खिशाचं आंदण असतं.


लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या चुकांनातिच्या पदराचं पांघरुण असतं
तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुणअसतं.


लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी समझोता तर कधी भांडण असतं
तो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं
कपातल्या वादळालाचहाबरोबर संपवायचं असतं.


लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी दोन मनांचं मीलन असतं
तर कधी दोन जिवांचं भांडण असतं
एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं
संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं.



लग्न लग्न म्हणजे काय असतं?
प्रेमाचं ते बंधन असतं
घराचं ते घरपण असतं
विधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं

तेव्हा पासून प्रेम हे आंधळ आहे..

एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी लपा-
छपी खेळायचे ठरवले, वेड्यावर राज्य होत,
तो १,२,३ ....असे आकडे म्हणू लागला,
इकडे प्रेम लपण्यासाठी जागा बघत होत, पण
प्रेमाला प्रेमाची जागाच मिळत नव्हती, वेड्याचे
आकडे जेव्हा संपत आले तेव्हा प्रेमाने पटकन
समोरच्या झुडपात उडी टाकली, ते झुडूप
गुलाबांच्या फुलांच होत आणि तेथे प्रेम लपून
बसलं .............
वेड्याने प्रेमाला भरपूर शोधलं, पण प्रेम
काही मिळाले नाही, शेवटी स्वताहाची हार
सहन न झाल्या मुळे वेड्याने चिडून
समोरच्या झुड्प्यात जोराने काठी खुपसली व
बाहेर काढली ........
बाहेर काढल्या नंतर काठीला लागलेलं रक्त बघून
वेड दचकला त्याने झुडूपा मध्ये वाकून बघितलं,
तेव्हा तिथे त्याला हसत असलेल प्रेम दिसलं, पण
तो पर्यंत ते प्रेम आंधळ झाल होत कारण
ती काठी त्या प्रेमाच्या डोळ्यात
खुपसली गेली होती ..........
ते पाहून वेड खूप रडला आणि त्याने प्रेमाला वचन
दिले कि इथून पुढे तू माझ्या डोळ्यांनी बघशील
म्हणजेच
मी नेहमी तुझ्या आधारासाठी तुझ्या बरोबर
राहीन ...............
♥ तेव्हा पासून प्रेम हे आंधळ आहे आणि प्रत्येक जण
प्रेमात वेडा आहे. ♥
 

आठवण...

आठवण...
एक अशी गोष्ट जी सगळ्यांकडे अगदी भरभरून असते...
आठवणींच्या राज्यात सगळेच श्रीमंत..
कारण आठवणी सगळ्यांना समृद्धच करतात...
हवेला गंध नसतो,पाण्याला रंग नसतो..
अन आठवणींना ... आठवणींना 'अंत' नसतो !!!

शनिवार, १७ मार्च, २०१२

साद हि अंतरीची, समजू दे स्पंदना..



साद हि अंतरीची,
समजू दे स्पंदना,
आठवण तुझी सखे,
हुरहूर लावी मना,
येऊ दे तू साज,
प्रीतीच्या अंगना......

आवाज तुझ्या मनीचा,
समजू दे माझ्या मना,
साथ तुझी गं साजणी,
लाभू दे जीवना,
तू सदैव सुखी रहा,
हिच ईशाकडे कामना......

?
घडला माझा गुन्हा,
परतून नाही आलीस,
जीवनी माझ्या पुन्हा,
वेडापिसा मी जीवनी,
जगतो तुझ्याविना........

सांगु कसे गं तुला मनीचे,
विचार माझ्या राणी,
घेऊन हात-हाती,
चल विहारू पाखरावाणी......

तुझ्याविन न माझ्या,
सोबतीला गं कोणी,
आठवण तुझी गं येता,
तरले डोळ्यांत माझ्या पाणी.....

करी हळुवार स्पर्श,
साजन साजनीच्या तना,
येई अंगा शहारा,
उठे मनी गोड संवेदना......

कशासाठी ?

डोळे कशासाठी ?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी ! ! !

आला भरून पाउस,
नको एकता जाउस,
सरी कशासाठी ?
तुला बिलगून भिजुन जाण्यासाठी . . .

नाव तुजे मनातले
चान्दनेच रानाताले
शब्द कशासाठी ?
तुला आठवून भरून घेण्यासाठी

वेल मोहरून आली,
फुले अंगभर झाली
वारा कशासाठी ?
गंधवनातुन पाखरू होण्यासाठी . . .

असा तुजा भरवसा
चाँदन्याचा कवडसा
ओठ कशासाठी ?
उरी थरारून जुलून गाण्यासाठी