गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१२

तुझी आठवण आली कि,

तुझी आठवण आली कि,
मला माझाच राग येतो..
संपले ना सर्व तुझ्याकडुन
मग असा का ञास देतोस?
नको त्या खोट्या शपथा,
...
... नको त्या सुखद आठवणी..
आठवुण सर्व काय करु
मग डोळ्यात येतं पाणी..
आठवणीँनी पाणावलेल्या डोळ्यांत...
तुला इतरांपासुन लपवु कसे?
भरभरुन वाहणाऱ्या अश्रुंना थोपवुन..
खोटे हसु आणायचे तरी कसे?
ते अश्रु लपवण्याच्या प्रयत्नांत..
मग मी तुलाच दोष देत राहते..
आणि या खोट्या प्रयत्नांत..
तुला आणखीनच आठवत राहते...

0 टिप्पणी(ण्या):