शुक्रवार, ३ जून, २०११

प्रेमायण sms संदेश भाग १


खरच  तु  पण  ना,
अशी  कशी  वेड्यासारखी  वागतेस,
फोनवर  रोम्यानटिक  गप्पा  मारून,
भेटल्यावर  हवा -पाण्याबद्दलच  बोलतेस...
तुच  माझी 
रूपमती 
साऱ्या मैत्रीणीत 
तुच
सौंदर्यवती 
म्हणूनच केली मी 
तुझ्यावर प्रीती
कधी बनशील तु
माझी
सौभाग्यवती...


विसरून मला प्रेमात ,
प्रेम परक्याचे होऊ नकोस,
तु माझी आहेस माझीच राहा,
कुणाच्या बापाला भिऊ नकोस...



प्रेम कसे करावे 
याचा हि कुठेतरी क्लास असावा,
प्रेम कसे करावे 
याचा हि कुठेतरी क्लास असावा
आणि प्रेमात नापास होणार्यासाठी १७ नंबर चा फॉर्म असावा ...


प्रत्येक सहवासात आस तुझी,
माझ्या प्रश्न मध्ये उत्तर तुझी.
माझ्या आठवणीत  कधी येऊन बघ
कळेल माझ्या जीवनात काय जागा तुझी...


रोज भेटायला कारण लागत नाही,
भेट नाही म्हणून  अंतर वाढत नाही
सुखदुख वाटून घेयला  सांगायला लागत नाही
प्रेमाशिवाय या आयुष्याला  अर्थ लागत नाही...


नजरेला तुझ्या प्रेमाचा नकार नाही,
आता कोणाची प्रतीक्षा नाही,
चूप चूप आहे मी
हा माझा अंदाज आहे,
तु हे नको समजु कि माझा तुझ्यावर प्रेम नाही...


विश्वास ठेव माझ्या मैत्री वर 
मला कोणाचं मन दुखवायचे नाही
तु आणि तुझा स्वभाव मला आवडला
नाही तर मी कोणाशी मैत्री बनवत नाही...



माझ्या अश्रूंच्या प्रत्येक थेंबात
फक्त तुझेच प्रतिबिंब  पाहीन 
कुणाची शप्पथ घेवू  सांग
आयुष्यात मी तुझ्यावरच प्रेम करत राहीन...

वाटले  नव्हते
स्वप्नात   सुद्धा ,
जुळतील  तुझे  नि  माझे
ऋणानुबंध..
निभावू  शकू  आपण  हे..
प्रेमाचे  रेशमी  बंध..!

रातराणी  उमलावी  तशी  उमलतेस,
मनापासून  दरवळ्तेस  
खरे  सांगू  का  तुला ,
मला तु खूप खूप आवडतेस  !

देवाच्या
मंदिरात  मी 
एकच  प्रार्थना
करतो 
सुखी  ठेव  तिला 
जिच्यावर  मी
प्रेम  करतो.. 

कळत नकळत  कधी  जुळतात  नाती
सुवास  याचा  असा  जशी  पावसाळ्यातली  माती
ऋणानुबंध  म्हणावे   कि  रेशीमगाठी 
कोणी   नाही  कुणाचे  तरी  जगतो  एकमेकांसाठी... 

कोणी माझ्यावरहि  अस प्रेम करेल
माझ्यावर हि कोणी जीव लावेल
आयुष्य ओवाळून टाकीन तिच्या एका हस्यासाठी,
कोणी एकदा माझ्यावर विश्वास ठेवेल...


पावसाचे  थेंब  जमिनीवर  पडताच,
मातीचा  सुगंध  दरवळतो.
तुझी  आठवण  येताच  तुला  भेटण्यासाठी  जीव  माझा
हुरहुरतो...

तुझ्यावर  राग  येणं हा  तुझ्याशी  बोलण्याचा  एक  बहाणा  आहे...
तू  बोलायला  लागलीस  कि  तो  लगेच  जातो...
तसा  माझा  राग  शहाणा  आहे.... 


तुझ्यात नि माझ्यात खरेच कुठे दुरावा आहे
तुझ्यात नि माझ्यात खरेच कुठे दुरावा आहे
आठवण तिकडे निघाली कि
उचकी इकडे पुरावा आहे...

अशांत  मनाचा
विश्वास  आहेस  तू ,
कित्येक  सवंगड्यात
खास  आहेस  तू ,
जिवंत  आहे  मी  कारण
श्वास  माझा  आहेस  तू ,
आभारी  आहे  मी  तुझा 
फक्त  माझी
आहेस  तू...

ती  कॉलेजात  दिसली कि 
कॉलेज कसे ''विधानसभे'' सारखे वाटते,
आणि तु माझ्या कडे एकदा हसलीस कि 
मला बिनविरोध ''आमदार'' झाल्यासारखे वाटते..

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलो आहे 
कि
मलाच मी सापडत नाही,
एकदा शोधावे म्हंटल 
तर 
तुझ्या शिवाय काहीच सापडत  नाही....


प्रेम इतके निरागस का असावे 
जे जोडीदाराला आपले जग समजते 
आणि 
इतके आंधळे का असते 
जे फुलाच्या वासावरून त्याला सुंदर ठरवते...

0 टिप्पणी(ण्या):