बुधवार, २४ ऑगस्ट, २०११

माझ्या चारोळ्या ...

माझ्या चारोळ्या
वाळवंटात हरवले
तरी जगण्याची जिद्द आहे 
कुठंच नसले म्हणून काय झाले 
माझ्या डोळ्यात तरी पाणी आहे!
 
 
 
 
प्रेम खरे कि खोटं  हे,
कधीच कळलं  नाही मला,
पण ज्या वळणावर आणून सोडलेस,
आता अवघड जातंय परतणे मला..
 
 
 
त्याने मागितलेच नाही,
जे मी गमावत गेले..
त्याने गमावले जे माझ्यात,
ते मी मागत गेले.. 
 
 
 
 माझे मन माझ्यासोबत नाही,
हे मला कळलेच नाही,
ते केव्हाचं तुझंच झालंय,
ते तुला अजून उमगलंच नाही..
 
 
 
तू नसलास समोर जरी,
शब्द कानात कुजबुजतात,
दिला नसलास होकार तरी,
स्वप्ने मनात गजबजतात.
मला वाट पाहायला लावं,
आता हे ही मला चालेल,
पण मी वाट पाहतेय तुझी,
हे तू विसरून कसं चालेल..?
 
 
 
प्रेम कसे असावे,
निस्वार्थी  अव्यक्त,
काहीही  न बोलता व्हावे..
अर्थपूर्ण व्यक्त..

0 टिप्पणी(ण्या):